Header Ads

निरोप कविता इयत्ता नववी | Nirop Kavita Iyatta Navavi (Kumarbharati )



इयत्ता नववीच्या कूमारभारतीच्या पुस्तकात अभ्यासाला असलेली निरोप कविता (इयत्ता नववी ) आज आपण बघणार आहोत. निरोप या कवितेच्या कवयित्री पद्मा गोळे आहेत. देशाचे रक्षण करण्यासाठी रणांगणावर जाणाऱ्या मुलाबद्दल आईच्या मनात येणाऱ्या वेगवेगळ्या भावनांचे वर्णन कवयित्रीने येथे निरोप या कवितेच्या माध्यमातून केले आहे.

निरोप कविता इयत्ता नववी

बाळ चाललास रणा,
घरा बांधिते तोरण
पंचप्राणाच्या ज्योतींनी
तूज करिते औक्षण.

याच विक्रमी बाहूंनी,
स्वतंत्रता राखायची आहे
खांद्यावरी या विसावे
शांती उद्या जगाची.

म्हणून या माझ्या डोळा
नाही थेंबही दुःखाचा ;
मीही महाराष्ट्र कन्या
धर्म जानते वीराचा.

नाही एकही हुंदका
मुखावाटे काढणार
मीच लावुनी ठेविली
तुझ्या तलवारीला धार

अशुभाची साऊलीही
नाही पडणार येथे ;
अरे मीही सांगते ना
जिजा - लक्षूमीशी नाते

तुझ्या शस्त्रांना, अस्त्रांना
शक्ती देईल भवानी
शिवरायांचे स्वरूप
आठवावे रणांगणी

धन्य करी माझी कूस
येई विजयी होऊन
पुन्हा माझ्या हाताने
दूध भात भरवीन !!

- पद्मा गोळे

❖ ❖ ❖ ❖



हे पण नक्की वाचा 👇👇👇👇


तर आज या पोस्टमध्ये आपण निरोप कविता इयत्ता नववी बघितली. तुमचे काही सजेशन्स किंवा प्रश्न असतील तर खाली कमेंट मध्ये नक्की विचारा आणि अधिक मराठी लिरिक्स संबंधित पोस्ट वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट द्यायला विसरू नका.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.